Aurangzeb's Death & The Deadly Maratha Civil War! Shahu Returns | स्वराज्याचे टेन्शन Podcast By  cover art

Aurangzeb's Death & The Deadly Maratha Civil War! Shahu Returns | स्वराज्याचे टेन्शन

Aurangzeb's Death & The Deadly Maratha Civil War! Shahu Returns | स्वराज्याचे टेन्शन

Listen for free

View show details
बाळाजी विश्वनाथ यांनी शून्यातून सुरुवात करून पुण्याचे सरसुभेदार होण्यापर्यंत मजल मारली होती... पण १७०४ ते १७०७ या काळात स्वराज्यावर एक भयंकर टेन्शन पसरले होते! खुद्द औरंगजेब लाखोची फौज घेऊन महाराष्ट्रात ठाण मांडून बसला होता. आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे... साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, शाहू महाराज... हे लहानपणापासून मुघलांच्या लाल रंगाच्या तंबूंच्या कैदेत अडकले होते! शाहू महाराजांची सुटका करण्यासाठी बाळाजी विश्वनाथ यांनी थेट मुघल छावणीत अत्यंत गुप्तपणे संपर्क साधायला सुरुवात केली. साक्षात मृत्यूच्या जबड्यात हात घालण्याचा हा प्रकार होता! अखेर २० फेब्रुवारी १७०७ मध्ये तो ऐतिहासिक प्रसंग घडला... मराठा साम्राज्य संपवण्याची प्रतिज्ञा करणारा औरंगजेब स्वतःच अहमदनगर जवळ मातीत कायमचा मिसळला! औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी झालेल्या रक्तरंजित संघर्षात आझम शाहने शाहू महाराजांची मुक्तता केली. तब्बल १८ वर्षांच्या भयंकर तुरुंगवासानंतर हा खरा वारसदार मायभूमीत परतत होता! पण पिक्चर अभी बाकी होता... महाराणी ताराबाई यांनी शाहू महाराजांना राजा मानण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्यांना तोतया ठरवले! स्वराज्याच्या गादीसाठी आता घरातच भयंकर आणि रक्तरंजित यादवी युद्ध पेटणार होते... ताराबाईंनी आपले सर्वात बलाढ्य सेनापती धनाजीराव जाधव यांना शाहू महाराजांना संपवण्यासाठी अंगावर सोडले! संपूर्ण महाराष्ट्रात एकच हाहाकार उडाला. आता शाहू महाराज कसे वाचणार? धनाजीराव जाधव यांची ती भयंकर तलवार कुणाचे रक्त सांडणार? आणि संकटात धावून येणारा बाळाजी आता कोणता डाव टाकणार? ... [Music Fades Out] Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
No reviews yet